Breaking News
Home / मालिका / माझ्यासाठी जग थांबलं होतं.. अर्जुनच्या वक्तव्याने नात्याला मिळणार गोड वळण
tharla tar mag serial good news
tharla tar mag serial good news

माझ्यासाठी जग थांबलं होतं.. अर्जुनच्या वक्तव्याने नात्याला मिळणार गोड वळण

ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेत सायलीला म्हणजेच तन्वीला संपवण्यासाठी महिपत वेगवेगळे डाव आखत आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर काही गुंडांनी हल्ला केला. सायली गंभीर अवस्थेत होती हे पाहून अर्जुनने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर तिला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होते मात्र सायलीला लागणारा रक्तगट त्यांना​ काहीही केल्या मिळत नसतो. हे पाहून अर्जुनचा गोंधळ उडतो. आता प्रतिमा आत्या नुकतीच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे. प्रतिमा आत्याच्या हाताला खरचटल्याने डॉक्टर तिला मलमपट्टी करत आहेत.

actress jui gadkari
actress jui gadkari

अशातच सायलीला ज्या रक्तगटाची गरज असते ते प्रतिमा आत्याला समजते. ती ताबडतोब तिचे रक्त सायलीला देते. अर्थात सायलीचा जीव जिच्यामुळे वाचतो ती प्रतिमा आत्या होती. हे अजूनही सुभेदार कुटुंबाला ठाऊक नसते पण सायलीचा जीव वाचतो हे पाहून अर्जुनचा जीव मात्र भांड्यात पडतो. सायली शुद्धीवर येताच अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलाय याची जाणीव सायलीला होत असते. कारण जोपर्यंत सायलीवरचे हे संकट सुटत नव्हते तोपर्यंत अर्जुन अस्वस्थ झालेला असतो. तू जेव्हा बेशुद्ध होती तेव्हा माझ्यासाठी जग थांबलं होतं ,तुम्हाला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो म्हणत अर्जुन सायलीवर असलेले प्रेम व्यक्त करतो. अर्जुनची अशी अवस्था पाहून सायली मात्र मोठ्या विचारात पडते. अर्जुन आपल्या प्रेमात पडलाय याची पुसटशी जाणीव तिला होत असते.

tharla tar mag serial
tharla tar mag serial

या घटनेमुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्याला गोड वळण मिळाले आहे हे पाहून प्रेक्षक मात्र भलतेच खुश झाले आहेत. कारण इतके दिवस नवरा बायको म्हणून खोटं खोटं नाटक करणारा अर्जुन आता खरोखरच सायलीच्या प्रेमात पडला आहे. सायलीवर असलेल्या प्रेमाची तो आता कबुली देत आहे. त्यामुळे मालिकेला एक रंजक वळण मिळाले आहे. पण यावर आता सायलीची प्रतिक्रिया काय असणार हे पहावे लागणार आहे. कारण सायली हे नातं स्वीकारायला नक्कीच सहजासहजी तयार होणार नाही हे प्रेक्षकांनाही ठाऊक आहे. त्यामुळे आता सायलीच्या होकाराची प्रेक्षकांनाही अपेक्षा लागून राहिली आहे. याच रंजक ट्विस्टमुळे प्रेक्षकांना ठरलं तर मग ही मालिका विशेष भावलेली पाहायला मिळते.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.