काही दिवसांपूर्वी घडलेलं कीर्ती मोटे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. किर्तीने प्रेमविवाह केला म्हणून तिच्या आईने आणि भावाने तिच्याविरोधात मोठं पाऊल उचललं होतं. ही धक्कादायक घटना पाहून अनेकांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. अशातच अनेक कलाकारांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेतील देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिची पोस्ट याच पार्श्वभूमीवर आहे त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

मीनाक्षी राठोड हिने अभिनेता कैलास वाघमारे सोबत लग्न केलं आहे. आपल्या दोन्ही बहिणींनी देखील इंटरकास्ट मॅरेज केलं आहे, पण यावर माझ्या आईने कधीच नाराजी दाखवली नाही. आपल्या पोस्टमध्ये ती नेमकं काय म्हणाली ते पाहुयात.. आई, मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय, किती राग आला असेल न तुला ताईचा. माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा! पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली! काल परवा आपल्या लहान मुलीचं ही inter caste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलंस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जण रीत आहे हे सांगून दिले! हे स्वीकारायचं बीज तुला कुठे गवसलं?

आपल्याला ५ मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस ! राग कसा ग control केलास? ते ही पप्पा नसतांना, तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं? हे असच “कीर्ती थोरे” च्या आईला का नाई वाटलं, एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्तीला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचंं बियाणं सापडूदे आई! काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली पोस्ट,आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे.
