Breaking News
Home / मालिका / माझी तुझी रेशीमगाठी मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली मालिका? हे आहे कारण
mazi tuzi reshimgath serial
mazi tuzi reshimgath serial

माझी तुझी रेशीमगाठी मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली मालिका? हे आहे कारण

माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठीवरील मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेतील परीचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले असल्याने आणि प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्या पुनरागमनाने मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे हेच या मालिकेचे खरे यश म्हणावे लागेल. अर्थात संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, मानसी मागिकर, अजित केळकर या अभिनयाची उत्तम जाण असलेल्या कलाकारांचीही साथ त्यांना मिळाली आहे. मात्र या मालिकेतील समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आता या मालिकेतून प्रेक्षकांना दिसणार नाही..

mazi tuzi reshimgath serial
mazi tuzi reshimgath serial

याचे एक खास कारण देखील आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध हटवल्याने नाटक आणि चित्रपट आता प्रेक्षकांना नाट्यगृहात, चित्रपट गृहामध्ये पाहायला मिळणार आहे. याची उत्सुकता मराठी सृष्टीसह हिंदी सृष्टीला आनंदित करणारी आहे. याच कारणामुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काही काळासाठी दिसणार नाही. संकर्षण कऱ्हाडे याने अभिनित केलेलं तू म्हणशील तसं… हे नाटक लवकरच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निर्बंध उठवल्यामुळे तू म्हणशील तसं हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २३ ऑक्टोबर रोजी या नाटकाचा प्रयोग बोरिवली येथील प्रबोधन ठाकरे येथे आणि २४ ऑक्टोबर रोजी डॉ काशीनाथ घाणेकर, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे संकर्षण कऱ्हाडे सध्या आपल्या नाटकाच्या दौऱ्यात व्यस्त असणार आहे. याचमुळे तो माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत काही काळासाठी तरी शूटिंगसाठी येऊ शकणार नाही.

sankarshan karhade tu mhanshil tasa
sankarshan karhade tu mhanshil tasa

तू म्हणशील तसं.. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांच्या गौरी थेटर्सच्या माध्यमातून केली जात आहे. या नाटकाचे लेखन स्वतः संकर्षण कऱ्हाडेने केले असून त्याने ही संकल्पना प्रशांत दामले यांच्याकडे बोलून दाखवली होती. प्रशांत दामले यांनी देखील या नाटकाच्या निर्मितीला आपला होकार कळवला होता. तर दिग्दर्शनाची धुरा प्रसाद ओक याने निभावल्याने ह्या नाटकाचे सूर छान जुळून आलेले पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षांपूर्वी पासून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र निर्बंधांमुळे ह्या नाटकाचे प्रयोग रद्द केले गेले. ह्या दौऱ्यामुळे संकर्षण आणि भक्ती देसाई ह्यांनी अभिनित करत असलेल्या मालिकांमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. या दौऱ्यातून जसा वेळ मिळेल तसे ते मालिकेतून तुरळक दिसतीलही आणि पुनरागमन करतीलही.

sankarshan prarthana shreyas masti
sankarshan prarthana shreyas masti

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.