Breaking News
Home / जरा हटके / लग्नानंतर या अभिनेत्रींनी साजरी केली पहिली वटपौर्णिमा.. तर काहींनी शूटिंगला लावली हजेरी
aboli girhe vatpournima

लग्नानंतर या अभिनेत्रींनी साजरी केली पहिली वटपौर्णिमा.. तर काहींनी शूटिंगला लावली हजेरी

गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका सृष्टीत लग्नाची धामधूम पाहायला मिळाली होती. झी मराठी वाहिनीवर नुकतेच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा रंगला तर स्टार प्रवाह वाहिनीवर शांतनू आणि पल्लवीचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. सोनी मराठी वाहिनीवरील सुंदर आमचे घर मालिकेतील काव्या रितेशने लग्न पार पडले. तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील लेक माझी दुर्गा मालिकेत दुर्गा आणि जयसिंगचा लग्नसोहळा पार पडला. त्यामुळे मराठी मालिका विश्वात पहिली वटपौर्णिमा साजरी करण्यावर भर दिलेला पाहायला मिळतो आहे.

aboli girhe vatpournima
aboli girhe vatpournima

रील लाईफमध्ये पहिली वटपौर्णिमा साजरी होत असताना रिअल लाईफमध्ये देखील मराठी सेलिब्रिटींनी आपली पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे. काही दिवसांपूर्वी जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कालिंदी म्हणजेच अभिनेत्री पूजा रायबागी हिचा अभिनेता प्रसाद दाबकेसोबत विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर तिने पहिली वटपौर्णिमा साजरी केलेली पाहायला मिळत आहे. तर मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेत्री श्वेता अंबिकर हिने दिग्दर्शक अमेय गोरे सोबत लग्नगाठ बांधली होती. तिची देखील ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. राजा राणी ची गं जोडी या मालिकेत  अंकिता निक्रड हिने अपर्णाची भूमिका गाजवली होती. या मालिकेमुळे अंकिताला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

aboli girhe hruta shivani
aboli girhe hruta shivani

काही महिन्यांपूर्वीच अंकिताने ज्ञानेश भुकेले सोबत विवाह केला होता. त्यामुळे ती देखील आपली पहिली वहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. सन मराठी वाहिनीवरील सुंदरी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अभिनेत्री प्रणाली नांगरेपाटील ही देखील काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झाली आहे. त्यामुळे प्रणालीची देखील लग्नानंतर पहिलीच वटपौर्णिमा आहे. हृता दुर्गुळे, शिवानी रांगोळे या गाजलेल्या अभिनेत्री देखील नुकत्याच विवाहबद्ध झाल्या आहेत. त्यामुळे लग्नानंतर त्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा साजरी होणार आहे. परंतु पहिल्या वटपौर्णिमेच्या दिवशी हृता आपल्या मन उडू उडू झालं या मालिकेच्या सेटवर शूटिंग साठी हजर झाली आहे.

तर शिवानी रंगोळेची ही पहिलीच वटपौर्णिमा असणार आहे. त्यामुळे या अभिनेत्री पहिली वटपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करतात याची अधिक उत्सुकता आहे. अभिनेत्रीप्रमाणे मराठी सृष्टीतील लोकप्रिय गायकांनी देखील यावर्षी थाटामाटात लग्न केले आहे. सायली कांबळे, जुईली जोगळेकर, अबोली गीऱ्हे या गायिका नुकत्याच विवाहबद्ध झाल्या अबोली गीऱ्हे हिने काही वेळापूर्वीच आपली पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे. पांडू चित्रपटातील गाण्यामुळे अबोली गीऱ्हे प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.