आर्यन खान विरोधात रोज नव नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. त्याच्यावर होणारे हे आरोप प्रत्यारोप खोडून काढण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार शाहरुख आणि आर्यन खानच्या बाजूने पुढे सरसावले आहेत. तो एक मुलगा आहे आणि त्याला तुम्ही किती त्रास देत आहात अशा टीका एनसीबी अधिकाऱ्यांवर केल्या जात आहेत. यावर एनसीबी महिला अधिकाऱ्याने नुकतीच एक कलाकारांना चपराक बसवणारी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आर्यन खान बाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आर्यन खान जाणून बुजून या गोष्टी करतो आहे.
त्याला अशा प्रकारच्या पार्ट्या करायला कोणी तिथं जायला सांगितल होतं, त्याच्या मोबाईलवरील व्हाट्सएप चॅट आणि फोटोग्राफ्स बद्दल अधिक माहिती जाणून आम्हीच शॉक झालो आहोत. आम्ही त्याचा फोन ताब्यात घेऊन तो पुढील तपासासाठी गांधीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. आर्यन खानवर कारवाई होत असताना त्याच्या कस्टडीत वाढ करावी लागली कारण त्याच्या फोन मधून सिद्ध झालं आहे की त्याचा थेट इंटरनॅशनल ड्रग कार्टेलशी संबंध जोडला गेला आहे. ह्या पूर्ण रेव्ह पार्टीवर जो छापा पडला आहे तो केवळ त्यात असलेल्या मुलांना पकडण्यासाठी नाही तर हे एक मोठे षडयंत्र असल्याचा आता खुलासा होत आहे. एनसीबीचे चीफ एस एन प्रधान यांनी त्यांच्या मीडियाला दिलेल्या मुलाखतीत देखील हेच सांगितले की हे प्रकरण खूप मोठे आहे. दोन आठवड्यापूर्वी आम्हाला या पार्टीबद्दल माहिती मिळाली होती त्यावर कारवाई कशी करायची याचा आम्ही प्लॅन आखला होता. एनसीबीचे अधिकारी संभाव्य धोका पत्करून त्या कृजवर दाखल झाले होते. चालत्या कृजला पकडून अशी कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली होती.
ह्यांची बुद्धी इतकी अफाट होती की तब्बल ८० हजार ते ५ लाख रुपयांचे तिकीट या पार्टीसाठी विकले होते . एनसीबी चे अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि घरांमध्ये छापे टाकतात म्हणून त्यांनी या पार्टीचे आयोजन क्रूझवर केले होते. परंतु त्या ह्या कारवाई बाबत पुढे असेही म्हणाल्या कि सिने इंडस्ट्रीकडून आर्यन खानला पाठिंबा देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. आर्यनच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केले जात आहेत की ‘तो एक बिचारा मुलगा आहे, तुम्ही शाहरूख खानच्या मागे लागले आहेत’. अशांना देखील या महिला अधिकाऱ्याने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. त्या म्हणतात की शाहरुख खानच्या मागं कोण लागलं आहे. स्वतः शाहरुखचा मुलगा असं म्हणतो की माझे वडील खूप बिझी आहेत. माझ्याशी बोलायला त्यांना वेळ नाही, जर मला त्यांच्याशी बोलायचं असेल तर मी त्यांच्या मॅनेजरकरडून जिचं नाव पूजा आहे तिच्याकडुन मला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. हे स्वतः आर्यन खान म्हणत असेल तर त्याच्या घरची परिस्थिती काय आहे हे तुमच्या लक्षात येईलच…