Breaking News
Home / मालिका / जयंती मेहतानी अनुष्काच्या लग्नासाठी सुचवले स्थळ.. मुलाचा फोटो पाहून अनुष्का गोंधळली
anushka wedding
anushka wedding

जयंती मेहतानी अनुष्काच्या लग्नासाठी सुचवले स्थळ.. मुलाचा फोटो पाहून अनुष्का गोंधळली

माझी तुझी रेशीमगाठ या मालीकेत अनुष्काला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिम्मी काकूंना देखील अनुष्का दिसल्याने नेहा परत आली असल्याचे तिला वाटत आहे. तर नेहाची बेस्ट फ्रेंड म्हणजेच शेफाली नेहाला गमावल्यामुळे खूपच दुःखी असते. अनुष्काला प्रत्यक्षात समोर पाहुन ती मात्र खुपच भावुक होते. नेहा परत आली असे तिला वाटत असतानाच मी नेहा नाही हे अनुष्का तिला स्पष्ट करते. मात्र मी नेहा नसले तरी एक मैत्रीण म्हणून तू माझ्यासोबत कधीही बोलू शकतेस. माझी कधीही गरज पडली तरी तू हक्काने मला सांगू शकतेस, असे बोलून अनुष्का शेफालीला धीर देते.

anushka wedding
anushka wedding

मालिकेतील हे सकारात्मक बदल प्रेक्षकांना हवेहवेसे आहेत. लवकरच अनुष्काला तिच्या पूर्वायुष्याबद्दल उलगडा व्हावा अशीही प्रेक्षकांची ईच्छा आहे. मालिकेत मेहता कुटुंब अनुष्काच्या लग्नाचा घाट घालत आहेत. जयंती मेहता आणि त्यांच्या पत्नीने अनुष्काच्या लग्नासाठी एक स्थळ सुचवलेले आहे. हा मुलगा बिजनेसमन आहे आणि तो स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे त्याच्या सोबत लग्न करायला तुला कुठलीही चिंता करण्याची गरज पडणार नाही असे छाया मेहता तिला म्हणतात. हातातील मुलाचा फोटो बघण्यासाठी ते अनुष्काकडे हट्ट धरतात. अनुष्का फोटो न पाहताच या मुलासोबत लग्न करायला तयार होते, मात्र छाया यांच्या आग्रहाखातर ती फोटो आपल्या हातात घेते. ह्या फोटोतला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून यश चौधरी आहे हे तिला समजते.

yash neha wedding
yash neha wedding

यश आपल्याला नेहा समजतो हे ती जाणून आहे. त्यामुळे अनुष्का त्याच्यासोबत लग्न करायला तयार होणार की नाही याचे उत्तर तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेल. यामागे जयंती मेहताचा तर काही प्लॅन नाही ना, असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. कारण चौधरी यांच्या कंपनीवर मेहतांचा डोळा आहे. यशसोबत अनुष्काचे लग्न झाले तर आपल्याला त्याचा फायदाच होईल असा त्यांचा समज आहे. अनुष्का ही त्यांची मुलगी नाही, मात्र आपली पत्नी तिच्यामुळे सुखरूप बचावली आहे. आणि म्हणूनच ते अनुष्काला तिच्या पूर्वायुष्यातील घटनेपासून अलिप्त ठेवत आहेत. अनुष्का हे आठवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, परंतु जयंती मेहता कशीबशी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

आता लग्नासाठी त्यांनीच यशचा प्रस्ताव आणल्याने नेहाला सर्व आठवणार का असा विचार प्रेक्षक करत आहेत. तर यश देखील अनुष्का सोबत लग्न करायला तयार होणार का, हे ही पाहावे लागणार आहे. त्यामुळे मालिकेचे पुढील काही भाग रंजक घडामोडी आणताना दिसणार आहेत. या ट्विस्टमुळे मालिकेचा घटलेला टीआरपी देखील हळूहळू वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मालिकेला टॉप २५ च्या यादीत देखील स्थान मिळवता आले नव्हते. मात्र आता हे सकारात्मक बदल पाहून या आठवड्यात मालिका ५ व्या स्थानावर येऊन पोहोचली आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.